
दांडगे यांनी दिलेल्या आदेशानुसार या आदेशातून शासकीय कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच आसपास पाच पेक्षा अधिक नागरिकांनी जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शस्त्रे, लाठ्या, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तु बाळगन्यास देखील मनाई केली आहे. दगड किंवा इतर उपकरणे किंवा शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही तसेच ती जवळ देखील बाळगता येणार नाही. जमाव बंदीचा हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू राहणार आहे. आज सकाळी ७ पासून ते 30 नोव्हेंबर रात्री १२ पर्यन्त हा जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.






