
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने पाच विकेट गमावून 326 धावा केल्या होत्या. आज सामन्याचा दुसरा दिवस असून भारतीय संघ पाच विकेट गमावून 326 धावांच्या पुढे खेळत आहे. (IND vs ENG 3rd Test)
भारताची धावसंख्या 350 धावांच्या पार
सात गडी गमावून भारताने 350 हून अधिक धावा केल्या आहेत. अश्विन 11 धावा तर ध्रुव जुरेल 10 धावांवर खेळत आहे. आज भारताला दोन धक्के बसले. कुलदीप चार तर जडेजा ११२ धावा करून बाद झाला. (IND vs ENG 3rd Test)
भारताला सातवा धक्का
दुसऱ्या दिवशीच्या डावाच्या अर्ध्या तासात भारताला दोन धक्के बसले. अँडरसनने कुलदीप यादवला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जो रूटने त्याच्याच चेंडूवर रवींद्र जडेजाचा झेल घेतला. जडेजाने 225 चेंडूत 112 धावांची खेळी खेळली. आपल्या खेळीत त्याने नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. सध्या रविचंद्रन अश्विन आणि ध्रुव जुरेल क्रीजवर आहेत.
कुलदीप यादव बाद
भारताला आज पहिला धक्का कुलदीप यादवच्या रूपाने बसला. दुसऱ्या दिवसाच्या चौथ्या षटकात अँडरसनने कुलदीपला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. कुलदीपने 24 चेंडूत 4 धावा केल्या. (IND vs ENG 3rd Test)
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारतीय संघ पाच विकेटवर 326 धावांनी पुढे खेळत आहे. इंग्लंडसाठी जो रूटने पहिले षटक टाकले. त्याच वेळी, जडेजा 110 धावा केल्यानंतर आणि कुलदीप तीन धावा केल्यानंतर क्रीजवर आहे. (IND vs ENG 3rd Test)
हेही वाचा :








