
हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर स्वयंघोषित धर्मप्रचारक सूरज पाल ऊर्फ ‘भोले बाबा’ बुधवारी प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दिसला. २ जुलैच्या घटनेनंतर मी खूप दु:खी आहे, पण जे घडणार आहे ते कोण रोखू शकेल? जो कोणी आला आहे, त्याला एक ना एक दिवस जायलाच हवं,” असं या धर्मगुरूनं एएनआयला सांगितलं.
एफआयआरमध्ये नाव नसलेले पाल म्हणाले, “आमचे वकील डॉ. एपी सिंह आणि प्रत्यक्षदर्शींनी आम्हाला माध्यमातील बातम्याबाबत सांगितले. त्यात काही तरी षडयंत्र आहे हे खरे आहे. आम्हाला एसआयटी आणि न्यायिक आयोगावर विश्वास आहे आणि सत्य बाहेर येईल. सध्या मी माझ्या जन्मगावी बहादूर नगर, कासगंज येथे आहे.