
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी गणपती बाप्पाचे दणक्यात स्वागत सुरु आहे. चैतन्यदायी वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. डीजे, ढोलताशाच्या गजरात तरुण मंडळींनी मिरवणूक काढत बाप्पाला विराजमान केले आहे. अनेक ठिकाणी जनजागृती करणारे देखावे, विविध समाजिक संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील नंदगाव आणि राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मंडळींनी पोलिसांकडून परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कार्यक्रमाची परवानगी नाकारली.










