
अनंतचतुर्थीनिमित्त मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. हा विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी मुंबई महापालिका तसेच मुंबई पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणुकीनिमित्त मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत तर काही पर्यायी मार्ग दिले आहेत. त्याचबरोबर शहरातील १३ धोकादायक पुलांची यादीही महापालिकेने दिली आहे. या पुलावरून मिरवणूक जात असताना १०० पेक्षा अधिक व्यक्ती एकाच वेळी नसाव्यात, असे निर्देश दिले आहेत.




