एल्विश यादव प्रकरणावर विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांना सध्या काहीही काम उरलेलं नाही. आम्ही काम करतोय. दररोज आमच्यावर आरोप करणं हेच विरोधकांचं काम आहे. आम्ही त्यांना कामातून प्रत्युत्तर देत आहोत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. यापूर्वीच्या सरकारने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू करत आहोत. काही लोकांनी ईगो ठेवून कामं बंद पाडली होती. असे राज्यकर्ते नसतात, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला हाणला आहे.






