
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. शेतीच्या वादातून झालेल्या हिंसक हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.