
रश्मिका म्हणाली की, ‘मला कित्येकदा वाटायचं की, हे सगळं भयावह असून यावर बोललं पाहिजे. पण, नंतर असं वाटायचं की, कोण याकडे लक्ष देईल. पण, आता मला खूप आनंद वाटतो आहे की, या प्रकरणात संपूर्ण मनोरंजन विश्व आमच्यासोबतीला उभं राहिलं. सगळ्यांनी आमची साथ दिली आणि यावर आपला रोष व्यक्त केला. आता मला कळलं की, बोलणं किती महत्त्वाचं असतं. माझी सगळ्या महिला वर्गाला विनंती आहे की, असं काहीही घडलं तर सहन न करता, त्याविषयी बोला. मदत नक्की मिळेल.’








