
एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीशी बोलताना निलेश साबळे म्हणाला की, ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम मी सोडला असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, सध्या हा कार्यक्रम चार-पाच महिन्यांच्या गॅपवर चालला आहे. चॅनलने ठरवलं तर, हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. तब्येतीच्या कारणाने मी आता थोडे दिवस या कार्यक्रमातून बाहेरच असेन’.