
आजकाल किरकोळ कारणावरून तरुण पिढी आत्महत्यासारखे टोकाचे निर्णय घेत आहेत. मराठा आरक्षण, बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, प्रेमात अपयश अशा कारणामुळे तरुण आत्महत्या करत असल्याच्या बातम्या नियमित येत असतात. मात्र बुलढाण्यात एका तरुणाने लग्न होत नसल्याच्या नैराश्येतून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. ऐन दिवाळीतच एका तरुणाने लग्न ठरत नसल्याच्या कारणामुळे आपली जीवनयात्रा संपवून संपूर्ण कुटूंबाला दु:खात टाकले आहे.






