
रमानंद सागर यांना अरुण गोविल यांच्या चेहऱ्यावर दिसलेले भाव आणि त्यांचं शांत हसणं, इतर कोणत्या अभिनेत्यामध्ये दिसलं नाही. म्हणूनच रामानंद सागर यांनी पुन्हा एकदा अरुण गोविल यांनाच बोलवून त्यांना रामाची भूमिका देऊ केली. पुढे या मालिकेने जो इतिहास घडवला, तो अनेक पिढ्यांनी पाहिला.








