
त्यावर अमृताने “सई ताम्हणकर एक अभिनेत्री म्हणून मला खूप आवडते. असे अनेकदा झाले आहे की मी तिची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला. पण मला समोरुन तसा प्रतिसाद मिळाला नाही” असे उत्तर दिले. त्यानंतर लगेच अवधूतने “काही भांडण वैगरे झाले होते का?” असे विचारले. त्यावर लगेच अमृताने “नाही नाही, अजिबात नाही. आता आपण एका सिनेसृष्टीत काम करतो, पण म्हणून आपण अगदीच सगळ्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतो, असे नाही”, असे म्हटले.






