
एका प्रसिद्ध वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला की, जेव्हा लोक त्याच्या कॅनेडियन नागरिकत्व स्वीकारण्यामागचे कारण न जाणून घेता, त्याला नावं ठेवतात तेव्हा त्याला वाईट वाटते. अक्षय म्हणाला, ‘भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे… मी जे काही कमावले आहे, जे काही मिळवले आहे ते मला येथून मिळाले आहे. आणि मी भाग्यवान आहे की मला परत देण्याचीही संधी मिळाली आहे. जेव्हा लोक काहीही नकळत काहीही बोलतात, तेव्हा खूप वाईट वाटते.’