
भाजपच्या या आरोपानंतर काटेवाडीत जोरदार चर्चा सुरूआहे. दरम्यान यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यावरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केले आहे. काटेवाडीच्या निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप भाजपकडून होत असेल तर त्याचे उत्तर खुद्द गृहमंत्री फडणवीस यांनीच दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपलाच यावरून सुनावले आहे. जो हरणारा असतो तोच असे आरोप करतो, असे मुनगंटीवार म्हणाले. मतदारांना पैसे वाटले असे म्हणणे हा मतदारांचा अवमान आहे. पक्षाची विचारधारा किंवा आपल्या स्वभावामुळे आपण हरतोय असे ज्यांना सांगता येत नाही ते मग पैसे वाटले असे आरोप करून मतदारांचा अवमान करतात, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.





