Aai Kuthe Kay Karte: ‘लग्न आहे ते…साजरं करावं’; प्रौढ वयात लग्न करण्यावर पहिल्यांदाच बोलली ‘अरुंधती’!

0
1
Aai Kuthe Kay Karte: ‘लग्न आहे ते…साजरं करावं’; प्रौढ वयात लग्न करण्यावर पहिल्यांदाच बोलली ‘अरुंधती’!


मधुराणी प्रभुलकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘अरुंधतीचं लग्न….हे व्हावं की नाही…? या वयात लग्न करावं का…? केलं तर ते इतकं साजरं करावं का? अशी विविध स्तरावर समाजात चर्चा झाली, होतेय. अनेकांना यात आनंद होतोय, तर काही जणांना मान्य होत नाहीये. पण मला नक्की असं वाटतं की, कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ वयात होतंय, किंवा दुसरेपणाचं आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावं असं का? लग्न आहे ते… साजरं करावं. हा इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे स्टार प्रवाहचे आणि आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता नाडकर्णीचे आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे.’



Source link