
सगळे आत जातात. कांचन आजी तिला टोमणे मारतात. पण यश आणि अप्पा आरोहीला शांत करुन जेवायला बसवतात. तेवढ्यात ईशा आणि अनिशमध्ये कडाक्याचे भांडण होते. ईशा थेट अट घालते की ‘आरोही घरातून जात नाही तो पर्यंत ती तिथे येणार नाही.’ त्यावर अनिश देखील तिला स्पष्ट शब्दात मग रहा तू इथेच मी तुला घ्यायला पुन्हा येणार नाही असे सांगते आणि निघून जातो. हे ऐकून आरोहीच्या डोळ्यात पाणी येते. ती तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करते पण यश तिला थांबवतो. तिचा हात पकडतो. हे कांचन आजी पाहातात. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.








