
‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आरोही आणि यशने अखेर प्रेमाची कबूली दिली असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने दोघांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र, कांचन आजीने नेहमी प्रमाणे विरोध केला. त्यानंतर आता कांचन आजी यशसमोर एक अट घालताना दिसतात. त्या आरोहीची परिक्षा घेणार आहेत. पण आता आरोहीने या परिक्षेला साफ नकार दिला आहे. त्यामुळे कांचन आजी ‘आता तिचा या घरातील गृहप्रवेश कधीच होणार नाही’ असे बोलताना दिसतात.








