Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशजयललिता यांच्यासोबत शत्रुत्व का होतं? रजनीकांत यांनी अखेर 35 वर्षांनी केला खुलासा,...

जयललिता यांच्यासोबत शत्रुत्व का होतं? रजनीकांत यांनी अखेर 35 वर्षांनी केला खुलासा, ‘उगाच माझं…’

जयललिता यांच्यासोबत शत्रुत्व का होतं? रजनीकांत यांनी अखेर 35 वर्षांनी केला खुलासा, ‘उगाच माझं…’

[ad_1]

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता (Jayalalithaa) यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादावर अखेर भाष्य केलं आहेत. दिवंगत नेत्या आणि चित्रपट निर्माते आर.एम. वीरप्पन यांच्याशी संबंधित एका घटनेमुळे त्यांच्या नात्याला वळण मिळालं असा खुलासा त्यांनी केला आहे. 

आर एम वीरप्पन यांच्या पुण्यतिथीनिमित्त नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डॉक्युमेंट्रीत रजनीकांत यांनी जयललिता यांनी केलेल्या वादग्रस्त सार्वजनिक टिप्पणीनंतर आरएम वीरप्पन यांना त्यांच्या मंत्रिपदावरून कसे काढून टाकले ते सांगितलं. हा कार्यक्रम वीरप्पन यांची निर्मिती कंपनी असलेल्या सत्य मूव्हीजने निर्मित ‘बाशा’ या चित्रपटाच्या 100 व्या दिवसाच्या समारंभादरम्यान घडला.

रजनीकांत यांनी ‘बॉम्ब कल्चर’वर केलं होतं भाष्य

रजनीकांत यांनी सभेला संबोधित करताना तामिळनाडूमध्ये “बॉम्ब संस्कृती” वाढत असल्याबद्दल इशारा दिला आणि चिंता व्यक्त केली की ही प्रवृत्ती राज्याला “स्मशानभूमी” बनवू शकते. त्यावेळी जयललिता वीरप्पन यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होत्या. रजनीकांत यांच्या मते, त्यांच्या वक्तव्यामुळे वीरप्पन यांना पदावरून काढून टाकण्यात आलं. या निर्णयामुळे रजनीकांत यांना खूप वाईट वाटलं होतं.

रजनीकांत म्हणाले की, त्यांना त्या रात्री झोप लागली नाही. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी वीरप्पन यांच्याशी संपर्क साधून खेद व्यक्त केला. तथापि, ज्येष्ठ नेत्याने विनम्रतेने उत्तर दिलं आणि रजनीकांत यांना काळजी न करता नेहमीप्रमाणे काम सुरू ठेवण्यास सांगितलं. जेव्हा रजनीकांत यांनी जयललिता यांच्याशी बोलून याप्रकरणी स्पष्टता करावी का? अशी विचारणा केली असता वीरप्पन यांनी तसं न करण्याचा सल्ला दिल. त्यांनी म्हटले की, “तुमचा स्वाभिमान गमावू नका. मला कोणत्याही पदाची गरज नाही. मी त्याच्याशी संलग्न नाही.”

तो क्षण आठवताना रजनीकांत भावूक झाले. त्यांनी आरएम वीरप्पन “खरा किंगमेकर” असल्याचं म्हटलं आणि जयललिता यांच्या राजकीय विरोधामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणून या घटनेचा उल्लेख केला. “मी त्यांच्याविरोधात का उभा राहिलो याचे हे एक प्रमुख कारण आहे,” असं रजनीकांत यांनी डॉक्यूमेंट्रीत म्हटलं आहे.

रजनीकांत आणि जयललिता यांच्यातील वाद

1990 च्या दशकातही रजनीकांत आणि जयललिता यांच्यातील मतभेदाच्या बातम्या प्रसिद्द झाल्या होत्या. विशेषतः जयललिता यांनी रजनीकांत यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर आणि काळ्या पैशांसंबंधी प्रत्युत्तरात, रजनीकांत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये रजनीकांत यांनी नेत्यांना राजकीय फायद्यासाठी त्यांचे नाव शस्त्र म्हणून वापरू नका किंवा त्यांच्या चाहत्यांमध्ये फूट पाडू नका असं आवाहन केलं होतं. 

आरएमव्ही म्हणून प्रेमाने ओळखले जाणारे आरएम वीरप्पन हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते तर तमिळ चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख शक्ती होते. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. रजनीकांत यांच्याशी त्यांची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय होती. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments