Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशऔरंगजेबला आव्हान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला वाचवणारी भारतातील पराक्रमी महाराणी

औरंगजेबला आव्हान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला वाचवणारी भारतातील पराक्रमी महाराणी

औरंगजेबला आव्हान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला वाचवणारी भारतातील पराक्रमी महाराणी

[ad_1]

Keladi Chennamma: सध्या देशभर गाजत असलेल्या छावा (Chhava) या सिनेमाच्या माध्यमातून  स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास पदड्यावर पहायला मिळत आहे. या चित्रपटामुळे क्रूर मुघल शासक औरंगजेब हा देखील चर्चेत आला आहे. औरंगजेब याच्या क्रूरतेचे अनेक किस्से समोर येत आहेत. यातच आता चर्चेत आली ही ती औरंगजेबला आव्हान देणारी भारतातील पराक्रमी महाराणी. या महाराणीनेच औरंगजेबला आव्हान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला वाचवले. जाणून घेऊया या महाराणी विषयी. 

इतिहासातील या पराक्रमी महाराणीचे नाव आहे चेन्नम्मा. या राणीचा इतिहासात फार कमी लोकांना माहिती आहे. केलाडीची राणी चेन्नम्मा हिने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर 25 वर्षांहून अधिक काळ उत्कृष्ट राज्य केले. तिने क्रूर हुकूमशहा औरंगजेबापासून तिचे राज्य वाचवले. चेन्नम्माचा जन्म कर्नाटकातील कुंडापुरा येथे सिद्धप्पा शेट्टी नावाच्या लिंगायत व्यावसायिकाच्या घरी झाला. 

केलाडीचा राजा सोमशेखर नायक यांच्याशी चेन्नमा राणीचा विवाह झाला. मात्र, कट रचून त्यांच्या पतीची  हत्या करण्यात आली. पतीच्या निधनानंतर केलाडीच्या लोकांची सुरक्षा आणि कल्याण जबाबदारी चेन्नम्मा यांच्यावर आली. त्यांनी अगदी उत्तम पद्धतीने राज्यकारबार सांभाळला. 

एकदा राज्यातील लोकांशी चेन्नम्मा संवाद साधत असताना त्यांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांच्याशी झाली. राजाराम साधुचे कपडे घालून त्याच्यांकडे आले होते.  मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांना मारण्यासाठी सैन्य पाठवल्याचे त्यांनी चेन्नमा यांना सांगितले.  दक्षिणेतील प्रत्येक शासक औरंगजेबच्या भीतीमुळे त्यांच्या राज्यातून जाऊ देत नव्हता.

अशा परिस्थितीत चेन्नमा राणीने राजाराम यांनी राज्यातून जाण्याची आणि गिंगीच्या किल्ल्यात तात्पुरता आश्रय घेण्याची परवानगी देण्याची विनंती केली. चेन्नम्माने होकार दिला आणि त्यांना आश्रय दिला. मुघल सैन्याला हे कळताच, औरंगजेबाने चेन्नम्मा यांना धमकीचे पत्र पाठवले. राजाराम आधीच केलाडी राज्यातून निघून गेल्याचे पत्र चेन्नमा यांनी औरंगजेबला पाठवले. 

राणीचे पत्र औरंगजेबापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मुघल सैन्याने केलाडीवर हल्ला केला.  चेन्नम्माने सागर येथील तिच्या लष्करी तळावरून झालेल्या लढाईत मुघलांचा धोका यशस्वीपणे परतवून लावला. अखेर, राजारामच्या यशस्वी पलायनाची बातमी किल्ल्यावर पोहोचल्यानंतर, औरंगजेबाने गिंगीला वेढा घालण्याच्या दिशेने आपले प्रयत्न वळवले.

केलाडीच्या सैनिकांनी मुघल आक्रमणाविरुद्ध शौर्याने लढा दिला. लवकरच मुसळधार पावसामुळे युद्ध थांबले. एके दिवशी, जान निसार खानला औरंगजेबाचा संदेश मिळाला, ज्यामध्ये राजाराम गिंगीमध्ये असल्याची माहिती देण्यात आली. मुघलांनी गिंगीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच केलाडीशी शांतता कराराचा प्रस्ताव ठेवला. चेन्नम्माला तिचे राज्य सुरक्षित आहे हे पाहून दिलासा मिळला.

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments