
Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघानं यंदाच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारलेली असतानाच आता या सामन्याआधी संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारे काही फोटो तूफान व्हायरल होत आहेत. बीसीसीआय (BCCI) अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी X च्या माध्यमातून हे फोटो सर्वांच्याच भेटीला आणल्यामुळं एका नव्या गोष्टीकडे संपूर्ण भारताचं लक्ष वेधलं आहे.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडलेला सामना पाहण्यासाठी शुक्ला पाकिस्तानमध्ये पोहोचले होते. गद्दाफी स्टेडियममध्ये या सामन्याचा आनंद घेतल्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी लाहोर इथं असणाऱ्या एका खास मंदिरात केले आणि तिथं असणाऱ्या एका किल्ल्यालाही भेट दिली. हे तेच ठिकाण आहे, जिथं प्रभू श्रीराम यांचे सुपुत्र लव यांचीही समाधी असल्याचं म्हटलं जातं.
‘लाहोरच्या प्राचीन किल्ल्यामध्ये प्रभू श्रीराम यांचे पुत्र लव यांची प्राचीन समाधी आहे. लाहोरचं नावही त्यांच्याच नावावरून देण्यात आलं आहे. तिथं जाऊन नतमस्तक होण्याची संधी मिळाली. सोबत पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवीसुद्धा होते. ते या समाधीचा जिर्णोद्धार करून घेत आहेत. मोहसीन यांनी मुख्यमंत्रीपदी असताना हे काम हाती घेतलं होतं. लाहोरच्या नगरपालिका नोंदींमध्ये ही बाब नमूद आहे की हे नगर भगवान श्रीराम यांचे पुत्र लव यांच्या नावावरून वसलं असून, कसूर शहराला त्यांचे दुसरे पुत्र कुश यांच्या नावावरून नाव देण्यात आलं आहे. पाकिस्तान सरकारनंही या गोष्टीला मान्यता दिली आहे’, असं शुक्ला यांनी त्यांच्या X पोस्टमध्ये लिहिलं.
लाहौर के प्राचीन क़िले में प्रभु राम के पुत्र लव की प्राचीन समाधि है लाहौर नाम भी उन्ही के नाम से है । वहाँ प्रार्थना का अवसर मिला । साथ में पाकिस्तान के गृहमंत्री मोहसिन नकवी जो इस समाधि का जीर्णोद्धार करवा रहे हैं । मोहसिन ने मुख्यमंत्री रहते यह काम शुरू करवाया था । pic.twitter.com/XUhyP0ZC67
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) March 6, 2025
लाहौर के म्युनिसिपल रिकॉर्ड में दर्ज है कि यह नगर भगवान राम के पुत्र लव के नाम से बसाया गया था और कसूर शहर उनके दूसरे पुत्र कुश के नाम से । पाकिस्तान सरकार भी यह बात मानती है । pic.twitter.com/OzalX9Vx7e
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) March 6, 2025
भारत- पाक सामन्यावर शुक्ला यांचं महत्त्वाचं वक्तव्य
दरम्यान, राजीव शुक्ला यांनी या ठिकाणाला भेट देण्याच्या एक दिवस आधीच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यानच्या द्वीपक्षीय सीरिजवरही वक्तव्य केलं होतं. भारत आणि पाकिस्तानमधील द्वीपक्षीय सीरिजसंदर्भातील स्वीकृतीसाठीचा प्रस्ताव भारत सरकारकडे विचाराधीन आहे. कोणतंही सरकार जेव्हा असे निर्णय घेतं तेव्हा अनेक गोष्टींचा विचार केला जातो आणि निर्णयाचा मुद्दा पूर्णपणे अंतर्गत चर्चेचा विषय ठरतो.