
शिर्डीतील साईबाबा संस्थानाकडून दररोज लाखो लोकांना अन्नछत्रामार्फत मोफत जेवण पुरवलं जातं मात्र हे मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी सगळे येथे गोळा झाले आहेत. त्यांच्याकडून पैसे घेऊन हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली.‘संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय,संपूर्ण महाराष्टातील भिकारी येथे गोळा झालेत’,असं विधानही सुजय विखे यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात केलं. या विधानावरून राजकारण तापलं आहे.





