
भारताने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय महिला संघाने समी फायनलमध्ये जपानचा २-० असा धुव्वा उडवला. आता महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना चीनशी होईल. चीनने पहिल्या सेमीफायनलमध्ये मलेशियाचा ३-१ असा पराभव केला होता.






