
कोकणात येणाऱ्याअणुऊर्जा प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केल्यानंतर संबंधित अणुऊर्जा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला. कोकणात अणुऊर्जा प्रकल्प आला आणि तिथे भूकंप होऊन सुनामी आली तर अणुऊर्जा प्रकल्पात पाणी शिरून हाहाकार माजेल, असं कारण दिलं गेलं. मात्र कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना कल्पना नाही का, मुंबईत १९६० साली बाबा ऑटोमिक सेंटर उभे करण्यात आले आहे. त्यामध्ये न्यूक्लिअर रिऍक्टर आहेत, आपल्या शहराच्या मध्यभागी अणुऊर्जा प्रकल्प आहे तर कोकणातला अणुऊर्जा प्रकल्प रद्द का करायला लावला, असा सवाल राज ठाकरेंनी वरळीतील सभेतून केला.