
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर कार आणि एसयूव्ही वाहनांना टोल माफ केल्याची घोषणा केली. पण या टोल माफीमुळे होणारे ट्राफीक पाहून मराठमोळा अभिनेता सुमीत राघवन चिडला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, ‘आम्हाला टोल माफीचे गाजर नको’ असे स्पष्ट मत मांडले आहे.