
जम्मू-काश्मीरवरून पाकिस्तानची हतबलता कोणापासूनही लपून राहिलेली नाही. महाराजा हरिसिंह यांनी जम्मू-काश्मीर भारतात विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला तेव्हापासून पाकिस्तानचा संताप आणि दु:ख कायम आहे. पाकिस्तानमध्ये दरवर्षी २७ ऑक्टोबर हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. १९४७ मध्ये याच दिवशी पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये उतरले होते.







