
शाळा ही केवळ शैक्षणिक शिक्षणाची केंद्रे नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात, हे सर्वश्रुत आहे. विषय ज्ञान देण्याबरोबरच शाळा अतिरिक्त उपक्रम, सह-शिक्षण, चारित्र्य निर्मिती, मूल्ये रुजवणे, टीमवर्क, सहकार्य, विविधतेचा आदर, समावेशन अशा अनेक गोष्टींना चालना देतात. त्यामुळं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती महत्त्वाची आहे, असं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे.