
राज्य सरकारच्या योजनेतून छत्रपती संभाजी नगरमध्ये दिव्यांगांना इ-रिक्षावाटप करण्यात आल्या. मात्र, ज्या दिवशी या रिक्षा दिल्या, त्याच दिवशी त्या बंद पडल्या. याबाबत बच्चू कडू यांच्याकडे तक्रारी आल्या. यानंतर बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचाऱ्यांना रिक्षाची पाहणी करण्यासाठी बोलावून घेतले. मात्र, कंपनीने पाठवलेल्या कर्मचाऱ्याला पुरेशी माहिती नव्हती. त्यामुळे बच्चूकडू संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. तुला काही माहिती नाही तर तू येथे कशाला आला? असा प्रश्न विचारत बच्चू कडूने अधिकाऱ्याला झापले.