
Maharashtra Weather Update : राज्यात पूढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, ठाणे, पालघर, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. समुद्रसपाटीवरील महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. २७ जून ते ३१ जून, १ जुलै रोजी कोकण, गोव्यात, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर पुणे, सातारा येथे पुढील काही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज







