Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray: सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का? क्षणाचाही विलंब न लावता...

Uddhav Thackeray: सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का? क्षणाचाही विलंब न लावता उद्धव ठाकरे म्हणाले…

[ad_1]

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूनै कौल दिला. राज्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती. महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. लोकसभा निवडणुकीत असे वातावरण होते की, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणी लढवू शकत नाही. पण त्यांचा हा अजिंक्यपणा किती खोटा हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही लढाई होती. मोदी सरकार हे आता एनडीएचे सरकार झाले . लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पारचा नारा दिला. अच्छे दिनाच्या प्रचाराचे काय झाले, मोदींच्या गॅरेंटीचे काय झाले? लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार रिक्षाच्या तीन चाकांसारखे आहे, केंद्रातील भाजप सरकारचीही अवस्था तशीच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय, त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही, असेही सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments