
ठरलं तर मग
‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून आपला पहिला नंबर टिकवून राहिली आहे. या आठवड्यातही मालिकेने ६.८चा टीआरपी मिळवून आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. या मालिकेत सध्या धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. एकीकडे मधुभाऊंची केस सुटण्याच्या मार्गावर असतानाच साक्षीला चैतन्य, अर्जुन आणि सायलीचा खेळ कळल्याने तिने आता मोठा पलटवार केला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आणि साक्षीला शिक्षा घडवण्यासाठी सायली, अर्जुन आणि चैतन्य आपली कंबर कसणार आहेत.







