
‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब प्रतिमाच्या मृत्यूच्या दुःखात बुडून गेलेले दिसणार आहेत. पूर्णा आजीला सांभाळण्यासाठी सायली आणि अर्जुन किल्लेदारांच्या घरी थांबणार आहेत. यावेळी सगळ्यांसाठी खायला बनवण्यासाठी सायली किल्लेदारांच्या स्वयंपाक घरात जाणार आहे. या स्वयंपाकघरात आल्यावर सायलीला तिच्या पूर्वाआयुष्याबद्दल काही भास होणार आहेत. यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागणार आहे. सायलीची तब्येत खराब होतेय, हे पाहून अर्जुन चौकशी करणार आहे. आपण याआधीही कधीतरी इथे येऊन गेलो, असं मला सतत वाटतंय आणि त्यामुळेच अस्वस्थ होत आहे, असं सायली अर्जुनला सांगणार आहे. तर सायलीच्या या बोलण्यावर हसत अर्जुन देखील म्हणणार आहे की, आपण आजपर्यंत कितीतरी वेळा या घरात आलोय त्यामुळेच हे होत असेल.