
पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात २५ मेपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जम्मू, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात २५ मेपर्यंत उष्णतेची लाट असेल, तर महाराष्ट्रात २४ मेपर्यंत अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज आहे.







