
अनेकदा रेल्वेमधून प्रवास करताना अचानक तिकीट हरवलं तर संपूर्ण प्रवासात टेन्शन राहतं. तिकीटासाठी पैसे खर्च केल्यानंतरही टीसीने पकडलं तर या चिंतेने मन व्यापलं जातं. मात्र आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला रेल्वेचा नियम माहित असणं गरजेचे आहे.
भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी म्हटली जाते. याच रेल्वेने दररोज कोट्यवधी प्रवासी ये-जा करत असता. रेल्वेकडून दररोज सुमारे 13 हजार गाड्या चालवल्या जातात. आपल्याला ही ट्रेनने प्रवास करायचा असेल तेव्हा आधी आपल्याला तिकीट काढावे लागते. जरी आता आपण ऑनलाइनकडे वळलो असलो, तरी सध्या घरबसल्या तिकीट खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर दुसरीकडे ज्यांना ऑनलाइन तिकीट काढता येत नाही, ते तिकीट काउंटवरुनच तिकीट खरेदी करुन प्रवास करतात. कदाचित ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट किती महत्त्वाचे आहे, हे कोणाला सांगण्याची गरज नाही. मात्र याचप्रवासादरम्यान तुमचे ट्रेनचे तिकीट कुठेतरी हरवले किंवा चुकले तर तुम्ही काय कराल? अशावेळी टिसीला न घाबरता रेल्वेच्या नियमानुसार तुम्ही ट्रेनचा प्रवास करु शकता. कसं ते जाणून घ्या…
काय आहे नियम?









