
लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अंतिम टप्प्याकडे वळली असून, देशात उद्या (दि.20) 49 जागांवर पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. या टप्प्यातील 49 जागांवर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची लाट (BJP Wave) स्पष्टपणे दिसली.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अंतिम टप्प्याकडे वळली असून, देशात उद्या (दि.20) 49 जागांवर पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. या टप्प्यातील 49 जागांवर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची लाट (BJP Wave) स्पष्टपणे दिसली. त्यावेळी काँग्रेसला केवळ एकही जागा जिंकता आली होती. मित्रपक्षांसह भाजपला 41 जागा मिळाल्या होत्या.
काँग्रेसचा बालेकिल्ला अमेठीत 2019 मध्ये पराभव झाला होता आणि फक्त रायबरेलीची जागा सोनिया गांधींमुळे जिंकली होती. यावेळी पुन्हा पाचव्या टप्यात अमेठी आणि रायबरेलीत मतदान होत आहे. रायबरेलीत काँग्रेसतर्फे राहुल गांधी, तर अमेठीत भाजपच्या स्मृती इराणींसमोर काँग्रेसने के. एल. शर्मा यांना संधी दिली आहे.