
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट जबरदस्त व्हायरल होत आहे. ही पोस्ट एका नोकरीसंदर्भात आहे. पण या नोकरीसाठी मराठी उमेदवारांनी अर्ज करु नये असे स्पष्ट लिहिण्यात आले आहे. बरं या नोकरीचे ठिकाण मुंबईतील गिरगाव आहे. गिरगाव हे ठिकाण आजपर्यंत चाळसंस्कृती, सणसंस्कृती जपणाऱ्या मराठी माणसांचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगाव भागात एका कंपनीला नोकरीसाठी मराठी माणूस नको असे म्हटले गेले आहे. या कंपनीची ही पोस्ट मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडिकरने शेअर करत संताप व्यक्त केला आहे.










