
नेमकं कारण काय?
यावर उत्तर देताना निलेश साबळे म्हणाला की, ‘हा कार्यक्रम पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे या कार्यक्रमात तुम्हाला सगळे नवीन कलाकार बघायला मिळत आहेत. श्रेया, भारत आणि कुशल हे कमालीचे कलाकार आहेत. मात्र, सध्या काही तांत्रिक बाबींमुळे आम्ही एकत्र येऊ शकत नाही. याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम जेव्हा थांबणार होता, तेव्हा तो काही महिन्यांसाठी ब्रेक घेणार होता. त्यामुळे मी नवीन काहीतरी करू असा निर्णय घेतला होता. पण, त्यावेळी वाहिनीने आमच्याबरोबर एक वर्षाचा करार केला. या करारावर ज्यांनी सही केली ते सध्या त्याच वाहिनीबरोबर काम करत आहेत. पण, आम्ही सही न केल्यामुळे काहीतरी नवीन करू शकत आहोत.’








