
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कार्तिकला तुरुंगात टाकल्यापासून सागर आणि मुक्ताचे नाते चांगले झाल्याचे दिसत आहे. तसेच कोळी कुटुंबीय आनंदात एकत्र आल्याचे दिसत आहे. सर्वांनी आनंदाने मुक्ताचे स्वागत केले आहे. स्वाती वर वर चांगुलपणाचा आव आणत असली तरी आतून ती मुक्ताविरोधात कट रचताना दिसत आहे. या सगळ्याचा परिणाम मुक्ता आणि सागरच्या नात्यावर होणार हे आगामी भागात कळणार आहे.







