
मुंबई हवामान विभागाने बुधवारी सायंकाळी ७ वाजता वर्तवलेल्या अंदाजानुसार सांगली,सोलापूर, अहमदनगर छ. संभाजीनगर,जालना,बीड,लातूर,धाराशिव, परभणी आणि पुणे जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. येथे ४०-५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.





