
सुरक्षित भारत प्रकल्प सायबर फसवणूकीला लावणार चाप
डॉटने वापरकर्त्यांना हेल्पलाइन नंबर १९३० किंवा www.cybercrime.gov.in वर कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्हे किंवा फसवणुकीची तक्रार करण्यास सांगितले आहे. या साठी ४ मार्च रोजी चक्षू सेवा सुरू करण्यात आली. या सेवेच्या लाभ घेऊन व्हॉट्सॲप वापरकर्ते हे ऑनलाइन फसवणुक झाल्यास या बाबतची तक्रार या ठिकाणी नोंदवू शकतात. दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकार सुरक्षित भारत प्रकल्पाच्या राष्ट्रीय, संघटनात्मक आणि वैयक्तिक अशा तीन स्तरांवर सायबर फसवणूक रोखण्यासाठी वेगाने काम करत आहे.






