
भाजपचं हे राजकारण आता थांबवायला हवं!
‘आता लोकांनी मिळून, एकत्र येऊन या सगळ्या क्लीन चिट विरोधात याचिका दाखल करण्याची गरज आहे. हे क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडं करणं गरजेचं आहे. कारण, आज भाजप सत्तेसाठी अत्यंत घाणेरडं राजकारण करत आहे. कोणत्याही थराला जात आहे. सगळ्या थर्ड ग्रेड लोकांना पक्षात घेत आहे. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र आणायचं. त्यांचे सगळे गुन्हे माफ करायचे. हे सगळं आता कुठंतरी थांबायला हवं,’ असं आवाहन दमानिया यांनी केलं आहे.






