
आययूएमएलचे राज्य सरचिटणीस पीएमए सलाम म्हणाले की केरळमध्ये शुक्रवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकांमुळे मतदार, निवडणूक अधिकारी आणि पोलिंग एजंट्सची गैरसोय होईल.
भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी निवडणुकीची तारीख जाहीर केली. एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची तारीखही आहे, २६ एप्रिल म्हणजेच शुक्रवार. हे पाहता मुस्लीम संघटनांनी निवडणूक आयोगाकडे तारीख बदलण्याची मागणी केली आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) आणि केरळमधील मुस्लिम संघटनेने मुस्लिम समुदायासाठी शुक्रवारचे महत्त्व सांगून 26 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे.
हे सुद्धा वाचा
मुस्लिम संघटनेचं काय म्हणणं
आययूएमएलचे राज्य सरचिटणीस पीएमए सलाम म्हणाले की, केरळमध्ये शुक्रवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकांमुळे मतदार, निवडणूक अधिकारी आणि पोलिंग एजंट्सची गैरसोय होईल. “शुक्रवार शुक्रवार आहे. या दिवशी मुस्लिम मशिदींमध्ये जमतात. या दिवशी केरळ आणि तामिळनाडूमध्ये मतदान करणे कठीण होईल. आम्ही हे निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिले आहे,” असे ते म्हणाले.









