
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली आहे. या स्टोरीमध्ये तिने लिहिले की, ‘जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत… नुकतंच मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते. तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमात पसरवल्या जात आहेत. कार्यक्रमठिकाणी अशी कोणतीच घटना घडली नसून माझा हात खेचल्यामुळे एका रिप्रेझेंटेटिवजशी मी नम्रपणे बोलले आहे. माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे. त्यांचा मी नेहमीच आदर करते. त्यामुळे अशा बातम्या पसरवू नये, ही विनंती. तुमची, रिंकू’. तिची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टमधून तिने या संपूर्ण प्रकरणावर आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिलं आहे.








