
चार वर्षांनी केला फोन!
या मुलाखतीत सिद्धार्थने विवेकला प्रश्न विचारला की, ‘गेल्या चार वर्षात तुम्ही तुमच्या मित्राला फोन केला की नाही?’ यावर उत्तर देताना विवेक म्हणाल की, ‘शाहरुख खानकडे एक नाही तर, १७ फोन आहेत. पण, माझ्याकडे त्याचा एकच नंबर आहे. एकदा ‘जवान’नंतर मी त्याला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. यानंतर मी अंघोळ करायला गेलो, तेव्हा त्याने परत मला कॉल केला. पण, त्यावेळी मी फोन उचलू शकलो नाही. तो सतत प्रवास करत असतो. त्याच्यावर सध्या खूप जबाबदाऱ्या आहेत. तो बॉलिवूडचा बादशाह आहे.’