
निवडणूक आयोगासोबत राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. ज्यामध्ये आरजेडी, काँग्रेस-एमएलने (बॅलेट पेपर) मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली होती. तर जेडीयूने राज्यात 3 टप्यात निवडणुका घेण्याची सूचना केली.
पाटणा : निवडणूक आयोगासोबत राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. ज्यामध्ये आरजेडी, काँग्रेस-एमएलने (बॅलेट पेपर) मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली होती. तर जेडीयूने राज्यात 3 टप्यात निवडणुका घेण्याची सूचना केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली 11 सदस्यीय पथक बिहारच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे.
पाटणा येथे राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळासोबत मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. ज्यामध्ये राज्यातील प्रमुख पक्ष आरजेडी, जेडीयू, काँग्रेस आणि सीपीआय (एमएल) यांनी आयोगासमोर आपले प्रस्ताव आणि मागण्या मांडल्या. यादरम्यान जेडीयूचे माजी अध्यक्ष लालन सिंह यांनी निवडणूक आयोगाला जास्तीत जास्त 3 टप्यात निवडणुका घेण्याची विनंती केली. जेणेकरून उमेदवारांवर होणारा खर्च कमी करता येईल. कारण प्रदीर्घ टप्यातील निवडणुका घेतल्यास उमेदवारांवर खर्चाचा बोजा वाढतो.









