Tharala Tar Mag 19th Feb: राजीनाम्यासोबतच चैतन्यने तोडलं अर्जुनशी नातं! ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुढं काय घडणार?

0
16
Tharala Tar Mag 19th Feb: राजीनाम्यासोबतच चैतन्यने तोडलं अर्जुनशी नातं! ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुढं काय घडणार?


चैतन्य देखील आपल्या रोजच्या वेळेप्रमाणे ऑफिसला जायला निघतो. मात्र, साक्षी चैतन्यला घरीच थांबवण्याचा प्रयत्न करते. अर्जुन आधीच चिडलेला असताना जर त्याचा राग शांत नाही झाला तर, तू ऑफिसला जाऊन काय करणार आहेस? असा प्रश्न साक्षी चैतन्यला करते. इतकंच नाही तर, साक्षी पुन्हा एकदा अर्जुनच्या विरोधात चैतन्यच्या मनात विष कालवते. चैतन्य आधी अर्जुनशी बोलून सगळ्या गोष्टी सोडवणार असतो. मात्र, साक्षीने पुन्हा मनात विष कालावल्यावर त्याचं मन देखील कलुषित होतं. अर्थात चैतन्य आणि अर्जुनमध्ये पुन्हा मैत्री होऊ नये, यासाठी साक्षी प्रयत्न करते.



Source link