
भाजप प्रवेशानंतर चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. ‘गेली ३८ वर्षे मी काँग्रेस पक्षात सक्रिय होतो. आता माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. नरेंद्र मोदी यांच्या कामातून एक स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते. त्यांच्या अपेक्षेनुसार राज्यात, देशात विकासाचं काम करायचं आहे. विकासात योगदान द्यायचं आहे, याच भावनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.