
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत ०-१ ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आणि यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीमुळे पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ६ बाद ३३६ अशी होती. (India vs England, 2nd Test)
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू
विशाखापट्टणममध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. यशस्वी जैस्वाल आणि रविचंद्रन अश्विन क्रीजवर आहेत. ९५ षटकांनंतर भारताची धावसंख्या ६ बाद ३४३ आहे.







