
‘मीरारोडची घटना म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा शांततापूर्ण मोर्चा अस्थिर करून लक्ष विचलित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. लाखो मराठ्यांनी मुंबई गाठावी अशी सरकारची इच्छा नाही. त्यामुळं ते जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी ते मुस्लिमांना हत्यार म्हणून वापरण्याची त्यांची जुनी रणनीती वापरत आहेत, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे.






