
राग देश
‘राग देश’ हा चित्रपट दुसर्या महायुद्धानंतरच्या कालखंडावर बेतलेला आहे. या चित्रपटात तो काल दाखवण्यात आला आहे, जेव्हा सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील सैन्य देशात परत येते आणि ब्रिटिशांशी लढण्यासाठी नव्या लोकांची भरती करू लागते. हा चित्रपट त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा सारांश दाखवणारा आहे. तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित या चित्रपटात कुणाल कपूर, अमित साध, मोहित मारवाह, विजय वर्मा आणि मृदुला मुरली, केनी बासुमातारी यांसारखे कलाकार झळकले आहेत.






