
पाटील म्हणाले, आम्ही मराठा आरक्षणासाठी तब्बल ४५ वर्षांपासून लढत आहोत. आतापर्यंत २५० जणांनी आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. मात्र, सरकार अजूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गांभीर्याने घेताना दिसत नाही. हे सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते? ज्या मराठ्यांनी सरकारला सत्तेत बसवले तेच सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही? हे भयानक आहे. आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. आमच्यावर लाठ्या चालवल्या तरी सुद्धा आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. आता मुंबईला जाण्याची घोषणा करून देखील सरकार आरक्षणाचा मुद्दा हा गांभीर्याने घेत नाही हा आंच्यावरील अन्यायाचा कळस आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं, तर मुंबईकडे जाण्याची वेळ आली नसती. मुंबईत काहीही झालं तरी हरकत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.







